34.5 C
Pune
Thursday, May 2, 2024

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया: भारताच्या आर्थिक नेतृत्वातील स्तंभ

Must read

ऋता कुलकर्णी
ऋता कुलकर्णी
ऋता ही कायदेतज्ज्ञ असून तिने आर्थिक व्यवहारांचे ज्ञान सुलभ होऊन ते सामान्य मराठी माणसांपर्यंत पोहोचावे म्हणून अर्थसाक्षरता नावाचा उपक्रम चालू केला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने १९३५ मध्ये तिच्या स्थापनेपासून भारतीय अर्थव्यवस्थेला आकार देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. आर्थिक धोरणाचे व्यवस्थापन करण्यापासून ते वित्तीय क्षेत्राचे नियमन करण्यापर्यंत, भारताच्या आर्थिक विकासाचा पाया घालण्यात RBI महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. भारताचा GDP १९५० मध्ये फक्त $३.६ अब्ज वरून २०२४ मध्ये $३.७ ट्रिलियन पर्यंत वाढला आहे आणि भारताकडे इतर सर्व देश फार मोठ्या अपेक्षेने बघत आहे. भारत जगातील विकसनशील देशांच्या यादीत पाचव्या क्रमांकाच्या स्थानावर आहे आणि या परिवर्तनामागील प्रमुख भूमिका RBI ची आहे.

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना:

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ऍक्ट, १९३४ अंतर्गत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली आणि एप्रिल १९३५ पासून नियमकाची भूमिका पार पडण्यास आणि देशाची मध्यवर्ती बँक म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आपले काम सुरू केले.रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय मुंबई मध्ये स्थित आहे.  हा कायदा हिल्टन यंग कमिशनच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या मध्यवर्ती बँकेसाठी फ्रेमवर्क प्रदान करतो.ज्याला भारतीय चलन आणि वित्तविषयक रॉयल कमिशन देखील म्हणतात.

 

१९४९ मध्ये बँकेचे राष्ट्रीयीकरण होईपर्यंत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शेअरहोल्डरची बँक म्हणून कार्यरत होती. राष्ट्रीयीकरणानंतर आर्थिक आणि वित्तीय धोरणाच्या पलीकडे राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेच्या विकासात RBI ची महत्त्वाची भूमिका होती. आणि आता तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची विकास धोरणे कृषी सारख्या इतर क्षेत्रातही विस्तारित झाली आहेत. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल बँक ऑफ ॲग्रिकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट यासारख्या अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय संस्थांची स्थापना करण्यात देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मदत केलेली आहे.

 

कालांतराने, बँकेचे लक्ष मध्यवर्ती बँकेच्या पारंपारिक कार्यांकडे कमी होत गेले. त्याची आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची तीन मुख्य उद्दिष्टे आहेत. ती म्हणजे:

 

नवीन चलन जारी करणे आणि त्याचे नियमन

राखीव चलन साठा ठेऊन भारताची आर्थिक स्थिरता सुरक्षित करणे

राष्ट्राच्या पत आणि चलन प्रणालीचे निरीक्षण आणि संचालन

 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. देशाच्या चलनविषयक आणि राजकोषीय धोरणाचे व्यवस्थापन आणि निरीक्षण करणे हे तिचे प्राथमिक कार्य आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया भारतीय रुपयाचे मूल्य देखरेख आणि व्यवस्थापित करण्याचे, वित्तीय बाजारांचे नियमन आणि चलनवाढ नियंत्रित करून अर्थव्यवस्थेला समर्थन देण्याचे काम करते.

 

रिझर्व बँक ऑफ इंडियाची प्रमुख कार्ये:

 

रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ही भारताची केंद्रीय बँकिंग संस्था आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI)च्या मुख्य कार्यांमध्ये भारतीय चलनाचे नियमन आणि नियंत्रण, आणि राष्ट्रीय बँकिंग प्रणालीची देखरेख करणे यांचा समावेश होतो.

 

चलनविषयक धोरणांचे नियमन: RBI अर्थव्यवस्थेची स्थिरता आणि आर्थिक वाढीसाठी चलनविषयक धोरणे बनवते आणि कार्यान्वयित करते. यामध्ये व्याज दरांचे समायोजन करणे, चलन पुरवठा नियंत्रित करण्याचा समावेश होतो. याची मदत आर्थिक स्थिरतेसह महागाई नियंत्रण करण्यात होते.

 

चलन जारी आणि व्यवस्थापन: RBI भारतातील करन्सी नोट जारी करणारी एकमेव संस्था आहे. तिचे काम भारतातील नवीन चलन जरी करणे आणि त्याचे वितरण करणे आहे.

 

बँकिंग विनियामन आणि पर्यवेक्षण: RBI बँक आणि आर्थिक संस्थांवर देखरेख ठेवण्याचे आणि पर्यवेक्षण करण्याचे काम करते. त्यामुळे बँकिंग क्षेत्रामधील  स्थिरता आणि शेवटी वित्तीय स्थिरता सुरक्षित ठेवायला मदत होते.

 

फॉरेन एक्सचेन्ज व्यवस्थापन: RBI भारताच्या फॉरेन एक्सचेन्जचे व्यवस्थापन करते आणि त्याच्या वापरासाठीच धोरण तयार करते. त्याचबरोबर RBI भारतीय रुपयाचा दर स्थिर ठेवण्याचे पण कार्य करते.

 

विकासात्मक कामे: RBI नागरिकांना भारताच्या आर्थिक विकासामध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहन देते. RBI अधिक चांगल्या बँकिंग सेवा, वित्तीय संरचना, आणि विविध क्षेत्रांमधील वृद्धीसाठी प्रोत्साहन देते.

 

 

रिझर्व बँक ऑफ इंडियाची भारतातील आर्थिक आणि वित्तीय स्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. आणि RBI कडे  भारताच्या आर्थिक स्थिरता, आर्थिक वृद्धी, आणि वित्तीय प्रणालीच्या सुरळीत कार्यकारिणीची जबाबदारी आहे.

More articles

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!
×